चंद्रशेखर गोखले उर्फ चांगो यांच्या ‘माझ्यापरीने मी’ या चारोळी संग्रहातील जीवनाचा वास्तविक दर्शन घडविणाऱ्या, विविध विषयांना हाताळत जीवनाची सत्यता सांगणाऱ्या काही सुंदर चारोळ्या...........
एक ओळख लागते आपल्याला
माणूस म्हणून जगण्यासाठी
इतकंच कशाला एकांतात
आरशात स्वतःला बघण्यासाठी.....
केवळ उडता येत म्हणून
फुलपाखरू उडत नाहीत
पण जरा निवांत बसली तर
माणसं त्यांना सोडत नाहीत.......
आपसूक डोळे भरून येतात
रडायचं नाही ठरविल्यावर
मन काहीतरी शोधत राहतं
जसं आपण शोधतो काही हरवल्यावर......
आरशात पाहताना हल्ली मला
माझी बरीच रूप दिसतात
आश्चर्य म्हणजे त्यातील बरीच
मला अनोळखी असतात....
रडायचं नाही म्हणून
गुदमरत राहिलास
आणि जरासं थोपटलं तर
बांध फुटल्यागत वाहीलास .....
आभाळभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे.....
देहाला पोसण्यासाठी
मनाला किती सोसाव लागतं
आकांत करत एका जागी
निमुटपणे बसव लागतं....
ओंजळ भरून सांगितलं तर
ओंजळ भरून मिळतं
पण आपली ओंजळ भरली हे
कितीजणांना कळतं......
---चंद्रशेखर गोखले.....
No comments:
Post a Comment