Showing posts with label मनमोराचा पिसारा..... Show all posts
Showing posts with label मनमोराचा पिसारा..... Show all posts

Thursday, 11 October 2012

आठवण - एक सोबती.......

आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र-सोबती भेटतात काही शेवट पर्यंत सोबत असतात तर काही फुलपाखरांसारखे आठवणीचे रंग मागे ठेवून दूर निघून जातात......आठव मात्र कधीच दूर जात नाही ती सदैव सोबत करत असते...आपण दुःखात असो अथवा आनंदात आठवं आपली पाठ कधी सोडतच नाही......अनेकदा विचार करते एकट बसावं...एकांतात जिथे कुणी नसेल तशी जागा आणि वेळ दोन्ही जुळून येते....आजूबाजूला कुणी नसतं असते, असते ती  फक्त एकांतातील मी....त्यावेळी सहज काही आठवत आणि एखाद्या  मुंग्यांच्या वारुळातून कशा एका मागोमाग साऱ्या मुंग्या निघतात तशा सर्व आठवणींचा पसारा मनात पसरतो......त्यात काही चांगल्या तर काही कटू आठवणी असतात .....चांगल्या मनाला तजेला देऊन जातात तर कटू नेहमीसाठी काही शिकवण देऊन........मात्र माझ्या या  एकांताला सोबत असते ती यांचीच..... या आठवणींच्या विश्वात रमायला मला काही काळ वेळ लागतं असही नाही नाही.......एखाद्या निरागस बालकाला मनसोक्त बगळतांना  पाहिलं..... शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांना भांडताना बघितल....कॉलेजच्या कट्यावर चालेली  मस्ती बघतांना असो अथवा खिडकीत बसून बाहेर पडणारा पाऊस बघतांना...संध्यासमयी आकाशात विहार करणारे पक्षी बघतांना असो  किंवा सुर्याबुडीला आल्यावर पसरणाऱ्या अंधारात  आठवणी सतत माझ्या पिच्छा पुरावा असतात......
आठवणी या अशाच असतात चार चौघात नको असतांना डोळ्यात अश्रू आणतात तर एकट असतांना  चेहरयावर  हास्य देऊन जातात.....आठवणी या अशाच असतात रोज उगविणाऱ्या कोवळ्या किरणांसारख्या, स्वछंद फुलणाऱ्या फुलांसारख्या, आयुष्याच्या  शेवटपर्यंत खरी साथ देणाऱ्या मित्रांसारख्या.......या आठवणीच तर असतात.....!!!
जिंदगी आगे बढ जाती है
पिछे निशाणी छोडकर
बातें अक्सर रह जाती है
यादों की कहानी बनकर....

-  दिपीका………

Thursday, 12 July 2012

समोरच्याला योग्यरीत्या समजून घेऊन योग्य प्रतिसाद देणं ही एक कलाच मानली पाहिजे...... एखादं नातं फुलवण्यासाठी ते गरजेच ही आहे.......पण, ही कला सर्वाँनाच अवगत असते असं नाही.....कारण, कुणी कधी समोरच्या व्यक्तिच्या भावना जाणून घेण्यात कमी पडतो...तर कुणी आपल्या भावना योग्य पद्धतीने समोरच्यापर्यँत पोहचविण्यात कमी पडत असतो.....

दिपीका.......

Sunday, 6 May 2012

***

आठवणी...... असतात स्वछंद फुलांसारख्या...

पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या मुलींसारख्या...

चित्राचे सौंदर्य वाढविणाऱ्या रंगांसारख्या...

आकाशात स्वैरपणे बाळगणाऱ्या पक्ष्यांसारख्या...

वर्षाकाळात चमकणाऱ्या विजेसारख्या...

रोज उगविणाऱ्या कोवळ्या काळीसारख्या....

आठवणी......... अशाच असतात ना....!!!


 

Thursday, 26 January 2012

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


सध्याची परिस्थिती बघता आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आहे असे वाटत नाही ... आज आपल्या देशाला प्रजासत्ताक होऊन ६२ वर्ष पूर्ण झाली "लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य" असे ब्रीदवाक्य घेऊन लोकशाहीचा पाया रचला... पण सध्या  या  शेतीप्रधान असलेल्या देशात शेतकऱ्यांची बिकट  परिस्थिती आहे.... कामगार देशोधडीला लागले.. एका बाजूला मोठ्या संखेने वाढणारी श्रीमंतांची संख्या तर दुसरीकडे त्यापेक्षा अ दुप्पट वेगाने वाढणारी गरिबांची संख्या हे आजचे गरिबांच्या घरावर नांगर फिरवला जातो..... श्रीमत अधिक वृद्धिंगत होत आहेत तर गरीब अजून गरीब...... प्रांत वाद भाषा वाद जातीवाद आणि आरक्षनाच्या माध्यमातून विषमता वाढतेय.... भ्रष्टाचार घोटाळ्यांनी देश पोखरत चाललाय .... मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी बेजबाबदार वागून देशाचे मालक बनू पाहत आहेत....... स्वतंत्र असूनही हुकुमही  एकाधीकाराकडी देश जातोय....... हेच का आपले प्रजासत्ताक..........
१५ ऑगस्ट २६ जानेवारी ला उफादुल येणारे देशप्रेम लागलीच नच दुसऱ्यादिवशी एखादी नाश उतरावी त्याप्रमाणे निघून जाते...... सिमेआच काय वरचे जवान मात्र दिवस रात्र आपल्या सीमेचे रक्षण करत असतात......पण देश आतूनच पोखरत चालला त्याच  काय ...... आज सामान्य जनतेनेही जागरूक आणि दक्ष राहून प्रजासत्ताक व्यवस्थेला पाठबळ देणे गरजेचे आहे...... तरच दश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल .....
दिपीका....

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


सध्याची परिस्थिती बघता आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आहे असे वाटत नाही ... आज आपल्या देशाला प्रजासत्ताक होऊन ६२ वर्ष पूर्ण झाली "लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य" असे ब्रीदवाक्य घेऊन लोकशाहीचा पाया रचला... पण सध्या  या  शेतीप्रधान असलेल्या देशात शेतकऱ्यांची बिकट  परिस्थिती आहे.... कामगार देशोधडीला लागले.. एका बाजूला मोठ्या संखेने वाढणारी श्रीमंतांची संख्या तर दुसरीकडे त्यापेक्षा अ दुप्पट वेगाने वाढणारी गरिबांची संख्या हे आजचे गरिबांच्या घरावर नांगर फिरवला जातो..... श्रीमत अधिक वृद्धिंगत होत आहेत तर गरीब अजून गरीब...... प्रांत वाद भाषा वाद जातीवाद आणि आरक्षनाच्या माध्यमातून विषमता वाढतेय.... भ्रष्टाचार घोटाळ्यांनी देश पोखरत चाललाय .... मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी बेजबाबदार वागून देशाचे मालक बनू पाहत आहेत....... स्वतंत्र असूनही हुकुमही  एकाधीकाराकडी देश जातोय....... हेच का आपले प्रजासत्ताक..........
१५ ऑगस्ट २६ जानेवारी ला उफादुल येणारे देशप्रेम लागलीच नच दुसऱ्यादिवशी एखादी नाश उतरावी त्याप्रमाणे निघून जाते...... सिमेआच काय वरचे जवान मात्र दिवस रात्र आपल्या सीमेचे रक्षण करत असतात......पण देश आतूनच पोखरत चालला त्याच  काय ...... आज सामान्य जनतेनेही जागरूक आणि दक्ष राहून प्रजासत्ताक व्यवस्थेला पाठबळ देणे गरजेचे आहे...... तरच दश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल .....
दिपीका....

Tuesday, 24 January 2012

जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसे भेटतात,
काही साथ देतात तर काही सोडून जातात...
काही दोन पावलंच चालतात आणि कायमची लक्षात रहातात...
    तर काही साथ देण्याची हमी तर देतात, पण गर्दीत हरवून जातात...

    खुप जपावशी वाटतात पण कधी जपता जपता तुटतात...परत नवीन नाती जुळतात...

आयुष्य म्हटल तर हे असचं.. हा प्रवाह असाच चालत राहणार...!
नाती ही अशीच असतात...

Monday, 23 January 2012

***
"
मिट्टी ,पत्थर ,घर, दौलत ओर आजादी से देश नाही बनता.....देश बनता है.. विरोंके शौर्य से तथा शहीदों के खून से..."!!!
--
नेताजी सुभाषचंद्र बोस......
खरचं देश ,राष्ट्र काय या निर्जीव वस्तूंनी बनत नाही.. तर तो बनतो व्यक्तीच्या त्यागाने........ आज नुसते भाषण देणारे खूप आहेत.. पण खऱ्या अर्थाने त्यागाची भूमिका स्वीकारून देशासाठी काही करू पाहणारे थोडेच.... भाषणाने काही राष्ट्र घडणार नाही तर पुठे होऊन कार्य केल्याने ते घडते हे जाणणारेही थोडेच .....
असेच काही नेताजी सुभाषचंद्र बोस होते..... प्रखर विचारांचे...... बुद्धीवादी....... काही झाले तरी आपल्या निश्च्याशी ठाम असणारे.......कुठलीही भीती बाळगता देशाप्रती आपले कर्तव्य पार पडणारे.......आज २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस.....अशा या विरास कोटी कोटी नमन...!!!

Monday, 16 January 2012

***
पतंग ...आकाशात स्वछंद उडणारे.....
संक्रांत आली की मुलांना पतंगात वेड लागतं... तहाण, भुक विसरुन ऊन्हाची तमा बाळगता... रस्त्यावर... घराच्या छतावर  नुसते त्या पतंगामागेच पळत असतात...कधी वाटतं अस असतं तरी काय त्या पतंगात...??
पतंग...म्हणजे नुसतं कागद नसते तर ताकद असते उडण्याची....काटण्याची... काटल गेल तरी परत उडण्याची....पतंग म्हणजे आपल्या आकांक्षा, महत्तवकांक्षा... वाऱ्‍याची दिशा म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीमधील संधी... मांजा म्हणजे आपले प्रयत्न आणि त्याची फिरकी म्हणजे साधनसंपत्तीचा साठा... पतंगाच आकाश म्हणजे आपलं कार्यक्षेत्र तर पतंगाची काटाकाटी म्हणजे व्यावसायिक स्पर्धा.... आकाशात पतंगाच वर्चस्व म्हणजे आपण आपल्या कार्यक्षेत्रात सिद्ध केलेली कर्तबगारी......
पतंग उडवायलाही काही कौशल्य लागतात... मांजा हातात घेतला की बोट कापणार याची तयारी ठेवुनच ते हाताळाव लागतं... त्याला योग्य वेळी ढिल आणि जरा घट्ट करता यायला हवं, तरच तो आकाशात उडतो... अगदी नातेसंबंधांसारखं..त्यांनाही जास्त ढिल देवुन चालत नाही.. थोडी बंधने घालावी लागतात...मांजा कधी सोडुन चालत नाही तसेच प्रयत्न देखील ते सोडुन यश हाती लागत नाही...पतंग जो पर्यँत दुकानात असतो तो पर्यँत निर्जीव असतो... पण आकाशात उंच उडालेला आणि कटुन आलेला पतंग हा जिवंत असतो... वारा प्यालेला, उंच जावुन आलेला, वाऱ्‍याशी टक्कर घेत फडफडलेला आणि उरलासुरला मांजा तुटल्यावर पुर्ण स्वतंत्र झालेला असतो....
पतंग खरं तर आयुष्य जगायला शिकवतो.... जिंकण काय असतं ते शिकवतो...!
दिपीका...